Posts

Showing posts from August, 2018

मातंग समाजाची झेंड्याविषयीची गफलत

हातभर लंगोट मिळत नव्हती.रंगाचा विचार करणं दुरचच होत. आज तोच समाज रंगाचा विचार करतोय, तेही झेंडाचा. ह्यावरून‌ समजत समाजाची प्रगती झालीय.सद्या मातंग समाजाचे कोनता झेंडा असावा म्हणुन सभे चालु आहेत,मिटींग चालु आहेत. कारण मातंगाचा एक रंगाचा झेंडा नाही.नांदेड,परभणी,बीड,हींगोली इकडे लाल झेंडा वापरतात तर पुणे, सोलापुरात भागात पिवळा आणि ह्या वेळेस लातुर ला भगवा सारखा दीसला. म्हणजे अख्या महाराष्ट्रात एक रंगाचा झेंडा नाही.आज मातंग समाज एक झेंडा असावा म्हणुन प्रयत्न करतोय. तर प्रश्र्न असा पडतो की, समाजाला आज पर्यंत झेंड्याची गरज पडली नाही का? मातंग समाजाचा झेंडा नव्हता का ? रंगाचा आणि झेंड्याचा विचार केला तर त्यांच्या इतिहास जुना आहे.राजे, महाराजे एखादा समुह हा विशीष्ठ रंगाचा वापर करायचे. युध्दप्रसंगी नसता जहाजावर झेंडे असायचे तो दुसरा प्रश्न....सांगण्याचा उद्देश इतकाच की झेंड्याचा इतिहास फारच जुना आहे. धर्मांचे झेंडे होते.पण देशातील‌ एका मोठ्या वर्गाला ,ज्याला चौथा वर्ग‌ मानलं गेलं होतं.धर्मान त्यांना शुद्र ठरवुन माणुस मनुन नाकारलं होतं.त्यात देशातल्या हजारो जाती होत्या. तो ब्राम्हणी धर...