सावधान
मांगानो सावधान धोक्याची घंटा तुम्हचा व्यवहार,तुम्हचे काम चोरी झालाय आणि चोरी होतोय. तुम्ही गावोगावी जाऊन वाजवुन खायायच काम चोरी होतोय.जे काम तुम्हच्या खिश्यात चार पैसे पाडत होत ते पळतय.तुम्हचच काय सार्याच जातीची कामे चोरी झालेत. चांभाराच चप्पल शिवन, कुभाराच मडके बनवन, गवड्याच घर बांधन,न्हाव्याच केस कापन सारच.आता कोनीही कोनतही काम करतय. जेव्हा पासुन या देशात बाबासाहेब जन्माला आले तेव्हा पासुन सारच बदलय.जाती नुसार काम बंद झालेत. तुम्हालाही माहीत आहे सद्या मोठ्या मोठ्या बॅन्ड पार्ट्या ह्या मोठ्या लोकांनच्या आहेत म्हणजे परजातीयाच्या ते एक्या कार्यक्रमात ८०ते ९०हजार कमवतात. आजच्या घडीचा विचार केला तर जास्तीत जास्त मांगाच्या घरी बॅन्ड बाजा आहे .खरतर सार्याच्याच घरी.आणि ज्याच्या घरी बॅन्ड नाही तिथला वाजवनारा असतोच.आपल्या छोट्या छोट्या पार्ट्या आहेत जे जास्तीत जास्त १५ ते २० हजार कमवतात.आता त्यातल प्रत्येकाला कीती येत तुम्हाला माहीतच आहे.कोनाला सुपारी भेटते तर कोनाला भेटत नाही.एक पार्टी २ नसता ३ लग्न वाजवते. आम्हच्या गल्लीत ईतकी ऊस्तुकता असते की सारे लहान मुल लोखंडी डबे,खोके,खपटे गळ्यात...